उधमपुरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला जेरबंद केल्याने पाकिस्तान अधिकच चवताळला अाहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जनरल (रिटायर्ड) परवेझ मुशर्रफ यांनी भारता प्रकरणी बेताल वक्तव्य केले हाेते. ‘पाकिस्ताने अण्वस्त्र ही शब्बे-बारातसाठी बनवलेली नाहीत, पाकिस्तानी सैनिकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत’ अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य हाेते. मुळात दाेनवेळा युद्धात लाजीरवाना पराभव झाल्यावही पाकिस्तानी नागरिकांमध्ये भारताची कुरापत काढण्याचा किडा वळवळताे याचेच अाश्चर्य वाटते.
अाता उधमपूरमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या अावळल्यानंतर अाता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख व लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) हमीद गुल यांनी स्वत:च्या अकलेचे दिवाळे ताेडणारे व्टिट् केले अाहे. ‘भारताच्या दाेन राजधान्यांचे हिराेशिमा-नागासाकी’ करू असे त्यांचे ते वक्तव्य हाेते.
मुळात गुल यांचे व्यक्तीमत्त्व हे वादग्रस्त राहिलेले अाहे. त्यातही पाकिस्तानी दहशतवाद्याने अापण पाकिस्तानी नागरिक असल्याचे कबुल केल्यानंतरही त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करक पाकिस्तानी लष्करी अधिकारीही जिहादीच असल्याचे स्पष्ट केले अाहे. अापली नेहमीची वापरातली म्हण वापरायचे म्हटले तर या ‘चाेराच्या उलट्या बाेंबा अाहेत.’
असाे पाकिस्तान मागील काही दिवासांपासून अस्वस्थ अाहे ताे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यामुळे. माेदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच शेजारील राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला. यात त्यांना म्यांमार, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांनी चांगला प्रतिसादही दिला. म्यांमारने तर चक्क त्यांच्या देशातील दहशतवादी तळं नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराला देशात कारवाईची परवानगी दिल्याने पाकिस्तान अधिक खवळला अाहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे अाणि तेही निवृत्त अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांची अस्वस्थता स्पष्ट करणारे अाहे. भारतीय लष्कराच्या मनात जितकां माेदींप्रती अादर अाहे. त्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांमधील अात्मविश्वास वाढला अाहे तितकीच पाकिस्तानी लष्कराने माेदींची धास्ती घेतली अाहे.
भारतीय लष्करातील जवान गमतीत म्हणतात, ‘साेजा पाकिस्तानी वरना माेदीजी काे बुलाऊंगा’, तेव्हा गुल यांचे वक्तव्य त्या दृष्टीने फारसे गांभीर्याने घेण्यासारखे नसलेे तरी त्याचा वेगळा अर्थ निश्चितच निघू शकताे. भारतामध्ये दहशतवादी हल्ला केलेल्या दहशतवाद्याला पकडल्यानंतर गुल यांनी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केल्यानंतर पाक लष्कराकडून त्यांची चांगलीच खरडपट्टी झाल्याचे समजते. यानंतरच पाक साेबत हमीद यांचीही बत्ती ‘गुल’ झाली अाणि त्यांनी ते वादग्रस्त वक्तव्य डिलीट केले.
चीन वगळता पाकिस्तान अाता एकाकी पडला अाहे. कधीकाळी चीनने भारताशेजारील राष्ट्रांना अापल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानातही अापल्या लष्करामार्फत पाक लष्कराला मदत केली अाहे. अजुनही हे कार्य सुरू अाहे. मात्र, अाता चीननेही पाकवरील अापले लक्ष कमी केले अाहे.
यासाऱ्याचा परिपाक म्हणजे पाकची अस्वस्था वाढत अाहे. एकीकडे अायएसअायएसचा धाेका, दुसरीकडे देशात वाढता दहशतवाद त्यातच भारताचे अाशियासह इतर खंडांमध्येही वाढते प्रस्थ पाकिस्तानला बेचैन करत अाहे.
अायएसअायएसला राेखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज अाहे. अमेरिका, रशियाची मदत घेत भारताने याचा गुप्त प्लान तयार केला अाहे. गरज पडलीच तर पाकच्याही मुसक्या अावळायला अमेरिका मागे-पुढे पाहणार नाही. अाश्चर्याची बाब म्हणजे भारताच्या मदतीला जी दाेन राष्टे सरसावलीत त्या दाेघांमध्येही ३६ चा अाकडा अाहे. परंतु, भारत अमेरिका व रशिया या दाेन राष्ट्रांमध्ये समेट घडवून चीनला शह देण्याची नवी चाल खेळताेय..... हा प्रयत्न यशस्वी झाला तर पाकिस्तानच काय तर चीनच्याही मुसक्या अावळायला अापण सज्ज असू.
अाता उधमपूरमध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या अावळल्यानंतर अाता पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख व लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) हमीद गुल यांनी स्वत:च्या अकलेचे दिवाळे ताेडणारे व्टिट् केले अाहे. ‘भारताच्या दाेन राजधान्यांचे हिराेशिमा-नागासाकी’ करू असे त्यांचे ते वक्तव्य हाेते.
मुळात गुल यांचे व्यक्तीमत्त्व हे वादग्रस्त राहिलेले अाहे. त्यातही पाकिस्तानी दहशतवाद्याने अापण पाकिस्तानी नागरिक असल्याचे कबुल केल्यानंतरही त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करक पाकिस्तानी लष्करी अधिकारीही जिहादीच असल्याचे स्पष्ट केले अाहे. अापली नेहमीची वापरातली म्हण वापरायचे म्हटले तर या ‘चाेराच्या उलट्या बाेंबा अाहेत.’
असाे पाकिस्तान मागील काही दिवासांपासून अस्वस्थ अाहे ताे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यामुळे. माेदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर लगेचच शेजारील राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू केला. यात त्यांना म्यांमार, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांनी चांगला प्रतिसादही दिला. म्यांमारने तर चक्क त्यांच्या देशातील दहशतवादी तळं नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कराला देशात कारवाईची परवानगी दिल्याने पाकिस्तान अधिक खवळला अाहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे अाणि तेही निवृत्त अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांची अस्वस्थता स्पष्ट करणारे अाहे. भारतीय लष्कराच्या मनात जितकां माेदींप्रती अादर अाहे. त्यांनी सत्ता हातात घेतल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांमधील अात्मविश्वास वाढला अाहे तितकीच पाकिस्तानी लष्कराने माेदींची धास्ती घेतली अाहे.
भारतीय लष्करातील जवान गमतीत म्हणतात, ‘साेजा पाकिस्तानी वरना माेदीजी काे बुलाऊंगा’, तेव्हा गुल यांचे वक्तव्य त्या दृष्टीने फारसे गांभीर्याने घेण्यासारखे नसलेे तरी त्याचा वेगळा अर्थ निश्चितच निघू शकताे. भारतामध्ये दहशतवादी हल्ला केलेल्या दहशतवाद्याला पकडल्यानंतर गुल यांनी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केल्यानंतर पाक लष्कराकडून त्यांची चांगलीच खरडपट्टी झाल्याचे समजते. यानंतरच पाक साेबत हमीद यांचीही बत्ती ‘गुल’ झाली अाणि त्यांनी ते वादग्रस्त वक्तव्य डिलीट केले.
चीन वगळता पाकिस्तान अाता एकाकी पडला अाहे. कधीकाळी चीनने भारताशेजारील राष्ट्रांना अापल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करत पाकिस्तानातही अापल्या लष्करामार्फत पाक लष्कराला मदत केली अाहे. अजुनही हे कार्य सुरू अाहे. मात्र, अाता चीननेही पाकवरील अापले लक्ष कमी केले अाहे.
यासाऱ्याचा परिपाक म्हणजे पाकची अस्वस्था वाढत अाहे. एकीकडे अायएसअायएसचा धाेका, दुसरीकडे देशात वाढता दहशतवाद त्यातच भारताचे अाशियासह इतर खंडांमध्येही वाढते प्रस्थ पाकिस्तानला बेचैन करत अाहे.
अायएसअायएसला राेखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज अाहे. अमेरिका, रशियाची मदत घेत भारताने याचा गुप्त प्लान तयार केला अाहे. गरज पडलीच तर पाकच्याही मुसक्या अावळायला अमेरिका मागे-पुढे पाहणार नाही. अाश्चर्याची बाब म्हणजे भारताच्या मदतीला जी दाेन राष्टे सरसावलीत त्या दाेघांमध्येही ३६ चा अाकडा अाहे. परंतु, भारत अमेरिका व रशिया या दाेन राष्ट्रांमध्ये समेट घडवून चीनला शह देण्याची नवी चाल खेळताेय..... हा प्रयत्न यशस्वी झाला तर पाकिस्तानच काय तर चीनच्याही मुसक्या अावळायला अापण सज्ज असू.
No comments:
Post a Comment