नि:शब्द मनाच्या लहरी काय असतात ते स्वत:च्या मनात डाेकावल्याशिवाय अापल्याला कळणार नाही. शरिराला वेदना झाली की अापण विव्हळताे, खूप अाेरडताे, उपचारांची परिसिमा गाठण्याचाही प्रयत्न करताे. मात्र, मनाला झालेली इजा अापल्याला लवकर कळतच नाही. मन हे इतकं हळवं असतं की त्याची तुलनाच अापण कशाशीच करू शकत नाही..
सकाळी उठायला उशिर झाला तरी मन निरुत्साही हाेतं, अाॅफीसचा एखादा मेल (नकाे असलेला) अचानक पडला तरी मनाला वेदना हाेतात, गाडी चालू करताना पेट्राेल संपलेलं जाणवलं तरी मनालाच वेदना, बायकाेने डब्यात नावडती भाजी दिली तरी मनालाच ताण,,,,,, किती अाणि किती अापला अाणि मनाचा संबंध येताे...
म्हणतात अापण श्वासाशिवाय जगूच शकत नाहीत, पण मनाशिवाय तरी अापण कुठं जगू शकताे? त्याला अापली सारी गुपितं माहिती असतात.. ताे अापल्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार असताे. घटक्यात ताे घरी फेरफटका मारून येताे तर घटक्यात ताे काॅलेजातले दिवस अाठवताे.
अाता या मनावर अापण किती ताण द्यायचा? अाणि का? काही झालं तरी अापलं एकच मन उदास झालंय.. भकास वाटतंय... पण मन तर फुलपाखरू अाहे. त्याला स्वच्छंद उडायला अावडतं... त्याला मनसाेक्त उसळायला अावडतं.. कुणी अावडतं भेटलं की ते खुलतं अाणि नावडतं भेटलं की एखाद्या काेमेजलेल्या फुलासारखं निपचित पडून रहातं....
अशा मनाला सदैव सकारात्मक विचारांची जाेड हवी अाहे. वाईट गाेष्टी हाेतातच म्हणून काय चांगल्या गाेष्टी हाेण्याच्या थांबत नाहीत. मनात जितकी उर्जा अाहे तितकेच त्याच्यात विषही अाहे. अापण काेणता प्याला निवडायचा हे अापल्यावर अवलंबून अाहे.
विषाचा प्याला काही जणांना चांगला वाटेलही.... परंतु, उर्जा अर्थात सकारात्मक विचारांचा प्याला घेतला तर ताे चिरकाळ टिकताे हेही तितकेच खरे... म्हणूनच मना सज्जना.......
सकाळी उठायला उशिर झाला तरी मन निरुत्साही हाेतं, अाॅफीसचा एखादा मेल (नकाे असलेला) अचानक पडला तरी मनाला वेदना हाेतात, गाडी चालू करताना पेट्राेल संपलेलं जाणवलं तरी मनालाच वेदना, बायकाेने डब्यात नावडती भाजी दिली तरी मनालाच ताण,,,,,, किती अाणि किती अापला अाणि मनाचा संबंध येताे...
म्हणतात अापण श्वासाशिवाय जगूच शकत नाहीत, पण मनाशिवाय तरी अापण कुठं जगू शकताे? त्याला अापली सारी गुपितं माहिती असतात.. ताे अापल्या प्रत्येक घटनेचा साक्षिदार असताे. घटक्यात ताे घरी फेरफटका मारून येताे तर घटक्यात ताे काॅलेजातले दिवस अाठवताे.
अाता या मनावर अापण किती ताण द्यायचा? अाणि का? काही झालं तरी अापलं एकच मन उदास झालंय.. भकास वाटतंय... पण मन तर फुलपाखरू अाहे. त्याला स्वच्छंद उडायला अावडतं... त्याला मनसाेक्त उसळायला अावडतं.. कुणी अावडतं भेटलं की ते खुलतं अाणि नावडतं भेटलं की एखाद्या काेमेजलेल्या फुलासारखं निपचित पडून रहातं....
अशा मनाला सदैव सकारात्मक विचारांची जाेड हवी अाहे. वाईट गाेष्टी हाेतातच म्हणून काय चांगल्या गाेष्टी हाेण्याच्या थांबत नाहीत. मनात जितकी उर्जा अाहे तितकेच त्याच्यात विषही अाहे. अापण काेणता प्याला निवडायचा हे अापल्यावर अवलंबून अाहे.
विषाचा प्याला काही जणांना चांगला वाटेलही.... परंतु, उर्जा अर्थात सकारात्मक विचारांचा प्याला घेतला तर ताे चिरकाळ टिकताे हेही तितकेच खरे... म्हणूनच मना सज्जना.......