Thursday, January 15, 2015

दहशत, ‘वाद’ अाणि अापण

एका संकेतस्थळावरील बातम्यांना अाज सहज भेट दिली. काही नवीन अपडेट अाहेत का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक दिवशी निघणारा वर्तमानपत्राचा अंक, चॅनल्सचे सादरीकरण त्यात त्या बातम्या देते अाणि अापणही नित्य नियमाने त्यात त्या बातम्या वाचताे, एेकताे. बदल कुठेच दिसत नाही. दहशतवाद, बलात्कार, चाेरी, शेतकऱ्यांच्या अात्महत्या, अांतरराष्ट्रीय म्हणाल तर अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अाफ्रिकी देशात दहशतवादी हल्ले, गाेळीबार, माथेफेरुचे थैमान.... समाज प्रगतिशील हाेताेय असे एका बाजूला अापण म्हणताे, मात्र, दुसरीकडे समाजाची अधाेगती सुरू असल्याचे दिसून येतेय. समाजात कमालीचे नैराश्य वाढलेय. प्रत्येकजण तळ हातावरील अापली अायुष्यरेषा लवकरात लवकर कशी धुसर करता येईल या प्रयत्नात दिसताेय.
कामाच्या व्यापामुळे माझ्या प्रमाणेच अनेकांचे वाचन अाणि लिखाणही कमी झालेय.. सभा, संमेलने, मेळाव्यात साहित्यिक मंडळी माेठ्या ताेऱ्यात वाचनाची अावड लावा, चांगल्या सवयी जाेपासाचे फुकटचे सल्ले मुलांच्या गळी उतरवू पाहताहेत पण मागील कित्येक महिन्यात एखादे चांगले पुस्तक या साहित्यिकांना लिहता अाले नाही. समाजाच्या व्यथा मांडण्यापेक्षा त्यांना सकारात्मक मार्ग दाखवणाऱ्या चार अाेळी कविताही ते लिहू शकले नाहीत ही वस्तूस्थीती अाहे.
छाेटा-माेठ्या गाेष्टींवरून ‘अ’ वरून सुरू झालेला वाद कधी तुझ्या XXXXX पर्यंत पाेहंचला हेच एकमेकांना कळेनासे झालेय. प्रत्येकजण अापल्याच व्यापात गुंतला अाहे. अाजचा दिवस कधी मावळताे हे लवकर कळावे यासाठी हल्ली अाॅफीसच्या पूर्वेच्याएेवजी पश्चिमेलाच स्लाइड विंडाे लावल्या जाताहेत. सारं काही अस्वस्थ करणारं अाहे. दहशत, ‘वाद’ अाणि अापल्यातच गुंतत चाललेलाे ‘अापण’ सारखं....
 पुनरागमनायच...
मागील तीन ते चार वर्षांपासून ब्लाॅग विश्वासी संपर्क तुटला हाेता. मुक्त लिखाण करण्यासाठी यासारखे दुसरे माध्यम नाही याची उपरती झाल्याने पुन्हा अाज मनात विचार अाला. श्रीगणेशा केव्हाच केला हाेता अाता ठरवलं निदान काहीतरी पुन्हा लिहायचं... जसं जमेल तसं... वेळ असले तरी अाणि नसेल तरी.... पाणी वाहतं राहणं अधिक चांगलं अाहे. ते संचलं की त्याचे डबके बनायला वेळ लागत नाही.