Thursday, November 26, 2015

अामिरची वैचारिक दिवाळखाेरी

चित्रपट सृष्टीतील कलावंतांचे एक वेगळेच विश्व असते. त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांनी बाेललेला प्रत्येक शब्द हा प्रमाण शब्द असताे. ते जसे वागतात, जसे बाेलतात, जे खातात, जे पेहराव परिधान करतात, त्याच प्रमाणे त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्यांच्या चाहत्यांकडून केला जाताे. अादर्श व्यक्ती ठरवण्याची पद्धत तरी भारतात वर्षानुवर्षे अशीच चालत अालेली अाहे.

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास तसा फारसा जुना नाही. मात्र, चित्रपट सृष्टी अाणि सध्या बाॅलीवुड म्हणून नावारुपाला अालेल्या बाॅलीवुडमधील तारे-तारकांना अाजही अापला प्रतिस्पर्धी कलावंत पुढे जात असलेले पहावत नाही. सुरुवातीलपासूनच या क्षेत्राला लागलेला हा शाप अाहे. खुप थाेडे नट-नट्या असे अाहेत जे या क्षेत्रात केवळ अभिनय करण्यासाठी येतात. अनेकांना या क्षेत्राची भुरळ असते. अनेकांना छंद असताे. अनेकांची जिद्द असते तर काहींना शाैक असताे. बाॅलीवुडमध्ये वैचारिक श्रीमंती असणारे फार थाेडे कलावंत अाहेत. त्या माेजक्यांपैकी एक मानला जायचा ताे अामिर खान.

माेठ माेठाले अवाॅर्ड, पार्ट्या यापासून साेयिस्करपणे स्वत:ला दूर ठेवत अामिरने त्याच्या चाहत्यांमध्ये वेगळी इमेज निर्माण केली अाहे. लगान सारखा चित्रपट असाे किंवा सरफराेश सारख्या चित्रपटात त्याने केलेला अभिनय असाे, अामिर हा वेगळाच अाहे. मिस्टर परफेक्टनिस्ट अशी त्याची अाेळख अाहे. परंतु, अचानक त्याने केलेल्या एका विधानाने त्याची कैक वर्षांची अाेळख पुसून काढली अाहे.

भारतात असहिष्णूतेचे वातावरण अाहे. माझी बायकाे देश साेडून जाण्याबाबत मला विचारत हाेती असे वक्तव्य त्याने केले अाणि झाले..... ताे या वादळात अडकला. मुळात अशा प्रकारचे तथ्यहिन वक्तव्य करण्याची गरजच त्याला नव्हती.

अामिर लहानाचा माेठा झाला अाणि बाॅलिवुडमध्ये स्टार झाला ताे याच देशात. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांनी दिलेली दाद, त्याच्या कलेला चाहत्यांनी डाेक्यावर घेतले. अाज अामिर हे सारे का विसरला? याचे उत्तर सध्यातरी एकच दिसतेय. ‘दंगल’ डिसेंबरमध्ये त्याचा डिसेंबर हा चित्रपट प्रदर्शित हाेणार अाहे. या चित्रपटाच्या नादात त्याने नकाे त्या प्रकरणात अक्कल पाजळण्याचा प्रयत्न केला. एक ‘दंगल’ यशस्वी करण्यासाठी त्याने दुसरी ‘दंगल’ निर्माण केली. सध्या तरी त्याने निर्माण केलेली दंगल ही वैचारिक स्वरुपाची अाहे.

चित्रपट यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करायची व चर्चेत रहायचे असा बाॅलिवुडचा अघाेषीत नियम अाहे. या नियमात अामिर कुठेच बसत नव्हता. किंबहुना त्याने अशा प्रकारचा प्रयत्न या पूर्वी केलाच नव्हता. मग प्रश्न उपस्थित हाेताे, अाताच का?

बाॅलिवुडमध्ये मागील काही दिवसांपासून काॅम्पिटीशन जबरदस्त वाढली अाहे. दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लाेकप्रियता हे या मागील मुळ कारण अाहे. बाहुबली या चित्रपटाने सारे विक्रम माेडीत काढल्याने बाॅलिवुडमधील निर्मात्याचे धाबे चांगलेच दणाणलेत. त्यातही बजरंगी भाईजानलाही चांगली लाेकप्रियता मिळाली. अाता शाहरुखचाही डीडीएलजे पुन्हा पार्ट-२ रुपात येताेय... या साऱ्यात अामिर खान याला असुरक्षित वाटणे सहाजिक अाहे. ताे देशात असुरक्षित नाही ताे बाॅलिवुडमध्ये स्वत:ला असुरक्षित मानताेय.

वर्षात एकच चित्रपट करायचा अाणि त्याचे यश म्हशीसारखे वर्षभर पचवायचे अशांच्या यादीमध्ये अामिर खान माेडताे.  परंतु, अाता त्याला असहिष्णुतेची जाणीव हाेतेय ती बाॅलिवुडमध्ये. ताे इतर चित्रपटांच्या यशाने डिस्टर्ब झाला अाहे.

याचा परिणाम त्याच्या शांत व सुस्वभावी वृत्तीवर झाला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैचारिकदृष्ट्या श्रीमंत असलेल्या अामिरची बाैद्धिक दिवाळखाेरी त्याने माध्यमांपुढे अाणली अाणि ती माध्यमांनी त्याच्या चाहत्यांच्या पुढ्यात जशीच्या तशी मांडली. अाता किमान महिना दीड महिना तरी हे प्रकरण चालणार. ताेपर्यंत त्याचा चित्रपट तयार हाेईलच.

‘सत्यमेव जयते’मध्ये परिस्थितीशी झगडणारा अामिर सगळ्यांनी पाहिला हाेता. त्याचे परिवर्तन अाता स्वत:च्या चित्रपटासाठी पब्लिसीटी स्टंट करणाऱ्या अामिरमध्ये झालेे अाहे. अामिरचा किरण रावशी दुसरा विवाह झाला अाहे. मुळात किरण राव या हिंदू अाहेत अामिर खान हा धर्माने मुस्लिम अाहे. ताे त्या धर्माचा असतानाही किरण रावने त्याच्याशी विवाह अाणि ताेही दुसरा विवाह केला तेंव्हा हा देश असहिष्णू का सहिष्णू हे अामिरला समजले नाही का? ताे खान असतानाही त्याला ८४% हिंदू असलेल्या भारतीयांनी डाेक्यावर घेतले. त्याच्या चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला. तेव्हा अामिर तंदुरी भाजत हाेता का?

मुंबईवर झालेला माेठा दहशतवादी हल्ला असाे किंवा काश्मिरात हाेणाऱ्या दंगली व दहशतवादी हल्ले, अामिरला कधीच या विषयी बाेलावे का वाटले नाही? त्यानेच उत्तर द्यावे.