Wednesday, December 20, 2017

खेड्यांकडे परत चला.....!

नुकतीच गुजरात अाणि हिमाचल प्रदेशची निवडणूक पार पडली. दाेन राज्यांची निवडणूक असतानाही साऱ्या देशाचे... देशाचे म्हणण्याएेवजी जगातील काही देशांचे गुजरातच्या निकालांकडे लक्ष लागले हाेते. व्यापार निमित्ताने बहुतांशी गुजराती जगातील विविध देशांमध्ये स्थायिक झालेत. त्यांचे गुजरातकडे लक्ष लागणे सहाजिकच अाहे. ३३ जिल्ह्यांच्या गुजरातमध्ये अहमदाबाद, कच्छ, भरूच, अाणंद, भावनगर, गांधीनगर, महेसाणा अशी काही शहरं अापल्या सतत एेकिवात अाहेत.  

फार क्वचित प्रसंगी गुजरातच्या ग्रामीण भागाविषयीचा उल्लेख इतर राज्यांमध्ये अापण एेकला असेल
. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशातील महत्वाच्या राज्यांतील ग्रामीण भागाची चर्चा सातत्याने हाेत असते. या राज्यांतील बहुतांशी जनता ही खेड्यांमध्येच वास्तव्यास असल्याने तसेच कृषी अाधारीत अर्थव्यवस्था असल्याने या राज्यातील छाेट्या-छाेट्या गावांचाही उल्लेख राष्ट्रस्तरावर चर्चिला जाताे. अर्थात अाता परिस्थिती बदलली अाहे. अाता या राज्यातील खेडेही अाेस पडत अाहेत. काहींनी तर कात टाकली असल्याने खेडे अाणि शहर या मधला टप्पा या गावांनी गाठला अाहे. असाे. विषय गुजरातचा. तर यंदाच्या गुजरातच्या निवडणुकांमध्ये किंगमेकर काेण असा प्रश्न केला असता अनेक जण पंतप्रधान माेदी, काही जण काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर बहुतांश जण हार्दिक पटेल, अल्पेश ठाकाेर, जिग्नेश मेवाणी या त्रिकुटाचे नाव घेतील. पण गुजरातमध्ये निवडणुकांमध्ये खरा किंगमेकर ठरली अाहे ती गुजरातची ग्रामीण भागातील जनता.  


जनतेने या साऱ्यांना अशा काही पद्धतीने नाचवलेय की न भूताे न भविष्यती अशीच ही निवडणूक ठरली
. सकाळपासून असेकाही बदल हाेत गेले की दिवस सरेपर्यंत नेमकं काेण जिंकलंय याचा अंदाजाच विश्लेषकांना येत नव्हता. अापण बाेलायचाे काही अाणि क्षणात अाकडे बदलतील की काय अशी धास्ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत हाेती. पण सायंकाळनंतर जस जसे चित्र स्पष्ट हाेण्यास सुरुवात झाली तस तसे मतदारांनी शिकवलेला धडा राजकारण्यांना धडकी भरवत गेला. गुजरातमध्ये २०१२, २०१४ नंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार अाले. मात्र, यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपतील ज्येष्ठ नेत्यांना चांगलाच घाम गाळायला लावला. मुळात मागील तीन टर्म गुजरामध्ये भाजपचेच सरकार असल्याने याही वेळी अापणच येऊ असा अहंकार भाजप नेत्यांना नडला. तर बंडखाेर अशी अाेळख निर्माण केलेल्या त्रिकुटाला साेबत घेतल्याने अापला विजय निश्चित असल्याचे काॅंग्रेसला वाटत हाेते. यातच काॅंग्रेसच्या नेत्यांचे बेताल वक्तव्य भाजपला अाधार देऊन गेले. या साऱ्या घडामाेडीत एक मात्र स्पष्टपणे जाणवते ते ग्रामीण जनता सरकारवर नाराज अाहे. निकालांच्या अाकडेवारीकडे नजर टाकली असता हे स्पष्ट हाेते. शहरी भागातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास टाकला अाहे तर ग्रामीण भागातील जनतेने मात्र, सरकार विराेधात काैल दिला अाहे. नाेटबंदी, जीएसटी, पाटीदार अारक्षण, अाेबीसींचे प्रश्न या साऱ्यांचा या निकालावर चांगलाच परिणाम दिसून अाला. अातापर्यंत हिंदुत्त्व व भावनिक अावाहनाला प्रतिसाद म्हणून गुजरात मधील ग्रामीण जनतेने भाजपवर विश्वास दर्शवला हाेता. मात्र, अाता चित्र पालटले अाहे. ग्रामीण भागातील समस्या कायम असल्याने नाराज जनतेने जातेच उलटे फिरवले अाहे. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे परत फिराचा मंत्र दिला हाेता. माेदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनीही खेड्यातील जनतेच्या समस्या साेडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करत खेड्यांकडे परत चलाचा नारा दिला हाेता. मात्र, प्रत्यक्षात काही उतरले नाही.

खेड्याकडे हाेणारे दुर्लक्ष माेदींना गुजरातमध्ये चांगलेच महागात पडले अाहे
. अाता कर्नाटक वगळता एकही राज्याची तुर्तास तरी निवडणूक नाही. त्यामुळे माेदींकडे भरपूर कालावधी असून, या काळात ग्रामीण जनतेच्या हितासंदर्भात त्यांनी जर चांगले निर्णय घेतले तरच अागामी काळात पुन्हा एकदा भाजप दिसेल अन्यथा राहुल गांधी तर तयारच अाहेतच......