Thursday, May 31, 2018

अापलं जमंत नाही अन‌् मी काही तुला साेडत नाही

पालघर निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला अाहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गडबडीने पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा ताेंडसुख घेतले. पालघरचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना भवनातून पत्रकार परिषदेचे अामंत्रण अाल्यानंतर लगाेलग साेशल मीडिया सक्रीय झाला हाेता.

काही चॅनलवाल्यांनी तर यावर कडी करत सेना भाजपसाेबत युती ताेडणार. उद्धव ठाकरे अशी घाेषणा करणार अशा स्ट्रीपही सुरू केल्या. अाेबी व्हॅन अॅक्टीव्ह झाल्या. राजकीय तज्ज्ञांकडे रिपाेर्टर्सनी धाव घेतली अन‌् अखेर पत्रकार परिषद सुरू झाली.
उद्धव यांच्या देहबाेलीवरून त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवत हाेती. ते काेणत्याही क्षणी केंद्र व राज्यातून भाजपचे समर्थन काढून घेतली अशी साऱ्यांची अाशा हाेती. पण झाले नेहमीचेच. ते अाले… बाेलले… अाणि गेले…

पत्रकार परिषदेत उद्धव यांनी लाेकशाही बचावचा नारा देत थेट निवडणूक अायाेगालाच अाव्हान दिले अाहे. निवडणूक अायाेग किती भ्रष्ट कारभार करतेय हे सांगत त्यांनी पालघर मधील निवडणूक अधिकाऱ्यांच्याच निलंबनाची मागणी केली. पालघरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कसे भाजपला नाकारले हे सांगताना त्यांनी शिवसेना व बहुजन विकास अाघाडीसह काॅंग्रेसला पडलेली मते एकत्र करत त्याची गाेळाबेरीजही मांडली.

निदान शेवटच्या क्षणी तरी उद्धव बाहेर पडण्याची घाेषणा करतील अशी अपेक्षा टीव्हीसमाेर बसलेल्या तमाम महाराष्ट्रीय जनतेला हाेती. मात्र, राजकारणात मुरलेल्या व शिवसेना माहित असलेल्या अनेकांनी पत्रकार परिषदेपूर्वीच चॅनलवाल्यांचे दावे खाेडत उद्धव ठाकरे अशी काेणतीही घाेषणा करणार नाहीत हे स्पष्ट केले हाेते. चंद्रकांत दादा पाटील यात अाघाडीवर हाेते. झाले तसेच पत्रकारांनी उद्धव यांचे निवेदन संपल्यानंतर सातत्याने त्यांना अाता बाहेर पडणार का असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली परंतु, भारतात लाेकशाहीची हत्या हाेतेय या मुद्द्यावर उद्धव ठाम हाेते. त्यांनी साेयीस्करपणे पत्रकारांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. एकंदर या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा एक गाेष्ट अधाेरेखित झाली अाहे, ती म्हणजे, अामचं काही जमंत नाही…अन‌् मी काही तुला साेडत नाही ही सेनेची भूमीका कायम असल्याचे.

भाजप सेना-युतीला ३४ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालाय. सेने भाजपमध्ये सर्वप्रथम १९८४ मध्ये युती झाली हाेती. लाेकसभेच्या निवडणुकीत मनाेहर जाेशी व वामनराव महाडिक भाजपच्या तिकीटावर लढले हाेते. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये काॅंग्रेसबद्दच्या सहानुभूतीमुळे या दाेन जागा साेडल्या तर देशभरात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला हाेता. यानंतर सातत्याने सेना-भाजपयुतीमध्ये चढ-उतार हाेत अालेत. १९८४ पासून ते अाज २०१८ पर्यंत अनेकदा सेना-भाजप युतीमध्ये फूट पडलेली अापल्याला दिसून येते.

अाता चित्र पालटले अाहे. दाेनही पक्षांनी एकमेकांचा अाधार घेत महाराष्ट्रात स्वत:चे स्थान निर्माण केले अाहे. भाजपनेही ग्रामीण भागात अापली ताकद वाढवत सेनेच्या ताब्यातील अनेक पालिका, ग्रामपंचायती, गा्वं, खेडी ताब्यात घेतली अाहेत.

शिवसेनेनेही भाजपला चिमटे काढणे काही साेडलेले नाही. वारंवार अाम्ही राजीनामे खिशातून ठेऊन फिरताे हे सांगायचे पण ते द्यायचे काही नाहीत या सेनेच्या अजब भूमिकेने सेनेतील निष्ठावानही कंटाळलेत. राज्यात जर युती तुटली किंवा सरकारमधून अापण बाहेर पडलाेत तर सेना फुटेल अशी भिती पक्षश्रेष्ठींना असल्याचे सेनेचे काही नेते व शिवसैनिक खाजगीत बाेलताना सांगतात. ही भितीच वारंवार खरी ठरतेय.

भाजप विराेधात जितके अाराेप मागील काही वर्षांपासून सेना करतेय तितके अाराेप विराेधकही करताना दिसत नाहीत. दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण प्रत्यक्षात कधी अंमलात येतेय तेच पहाण्यात विराेधक व्यस्त अाहेत. असाे, उद्धव यांनी पुन्हा एकदा भाजपवर केवळ अागपाखड करत तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना हेच सिद्ध केलंय असं म्हणायला काही हरकत नाही….

Saturday, May 26, 2018

पालघरमध्ये इंटरटेंन्मेंट..इंटरटेंन्मेंट...इंटरटेंन्मेंट…


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका क्लिपमुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले अाहे. देशात साेशल मीडियाचा सुळसुळाट झाल्यानंतर अशा राजकीय क्लिप महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत. सध्या शंकेची ‘पाल’ चुकचुकण्याचे कारण वेगळेच अाहे. भाजप-सेनेला ‘घर’ (गड) राखायचा असल्याने राजकारणाने टाेक गाठले अाहे.

३२ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती अाहे. १९८४ साली पहिल्यांदा लाेकसभा निवडणुकांसाठी भाजप व शिवसेनेत युती झाली हाेती. भाजपच्या ‘कमळा’ वर मनाेहर जाेशी अाणि वामनराव महाडिक यांनी निवडणूक लढवली हाेती. यानंतरचा हा युतीचा प्रवास सुरू झाला हाेता. सातत्याने यात चढ-उतार येत गेले. स्व. प्रमाेद महाजन व स्व. गाेपीनाथ मुंडे यांनी युतीची धुरा खांद्यावर घेतली हाेती. त्यांच्या निधनानंतर मात्र युतीला उतरती कळा लागण्यास सुरुवात झाली. नाेटबंदीनंतर या युतीला खऱ्या अर्थाने कधीही न संपणारे ग्रहण लागले अाणि मिठाचा माेठा खडा पडला. खडा कसला मिठाचे अागारच म्हणायला हवे.
८ नाेव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ वाजता नरेंद्र माेदी यांनी ५०० व हजाराच्या नाेटा बंद केल्या अाणि यानंतर झालेल्या शिवसेनेच्या प्रत्येक सभेमध्ये शिवसेनेने एकच सुर अाळवला. देशाचे अर्थकारण बिघडल्याचे उद्धव ठाकरे दाेन वर्षांपासून सांगत अाहेत. (नेमके कसले अाणि कुणाचे अर्थकारण गडबडले हा संशाेधनाचा विषय अाहे) सांगायचा भाग हाच की नरेंद्र माेदी यांचा हा ८ वाजताचा मुहूर्त युतीसाठी मात्र ‘गडबड’ ठरला अाहे.

राज्यात मागील एक वर्षात झालेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत, थेट सरपंच निवडणूक, विधान परिषद निवडणूक व लाेकसभेसाठीच्या पाेटनिवडणूकीत भाजपच्या विराेधकांच्या यादीत अाणखी एक नाव समाविष्ट झाले ते म्हणजे शिवसेनेचे. तसं सेनेनेही अापल्या विराेधकाची यादी अपडेट करत भाजपला यात सर्वाेच्च स्थानी बसवलेय. विराेधक कमकुवत असल्याने व त्यांना या ‘टाॅम अॅण्ड जेरी’ शाेचा फायदा उचलता न अाल्याने या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना व त्यांच्या सहकारी पक्षांचाच अधिक फायदा झाला हा भाग वेगळा.  

केंद्रातील माेदी सरकारला चारवर्ष पूर्ण झालेत. अवघ्या एका वर्षात पुन्हा लाेकसभा निवडणुका हाेत अाहेत. गुजरात पाठाेपाठ कर्नाटक निवडणुकांमध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर अाता महाराष्ट्रातही राजकीय वारे वेगाने वहायला सुरूवात झालीय. याचाच एक भाग म्हणून पालघरची लाेकसभा पाेटनिवडणूक चर्चेचा विषय ठरतेय.

सध्या या निवडणूक प्रचारात जनतेला ६४ कला अाणि १४ विद्यांची अनुभूती हाेतेय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काेणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच या इराद्याने भाजप, शिवसेना, बहुजन विकास अघाडी, काॅंग्रेस असे सारेच पक्ष बाह्या सावरून कामाला लागलेत.

याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाची एक क्लिप सार्वजनिक केली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीसाठी सत्तेचा वापर करत दबाव तंत्राचा अवलंब करत असल्याचा अाराेप सेनेने केला अाहे. दुसरीकडे या क्लिपमध्ये एडिटींग करण्यात अाले असून, ती अर्धवट क्लिप दाखवण्यात अाल्याचे सांगत सेनेचा दावा मुख्यमंत्र्यांनीच खाेडून काढला अाहे. मुख्यमंत्र्यांनी क्लिप अापलीच असल्याचे सांगितल्याने व उर्वरित भाग साऱ्यांच्या समाेर अाणल्याने शिवसेनेचे बुमरॅंग उलटले अाहे. काेण खाेटे, काेण खरे हे येणारा काळच ठरवेल परंतु, पालघरच्या सहा विधानसभा मतदारसंघासह उभ्या महाराष्ट‌्राचे मात्र यातून चांगलेच मनाेरंजन हाेतेय हे नक्की.  

पालघरची जखम
पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वानगा यांचे जानेवारीमध्ये ह्रदयविकराच्या धक्क्याने दिल्लीत निधन झाले. उत्तम जनसंपर्क, लाेकांच्या मदतीला धावणारा नेता, उत्कृष्ठ संघटक असणाऱ्या वानगा यांच्या निधनाने भाजपला चांगलाच धक्का बसला. वानगा हे एक दाेन नाही तर तब्बल तीनवेळा लाेकसभा तर २००९ मध्ये विधानसभेवर चांगल्या मताधिक्याने पालघरमधून निवडून अाले हाेते. त्यांनी या भागात भाजपला बळ दिले. वानगा यांच्या निधनानंतर त्यांचा माेठा मुलगा श्रीनिवास याला भाजपने लाेकसभेसाठी संधी द्यावी अशी वानगा कुटुंबीय व समर्थकांची इच्छा हाेती. मात्र भाजपच्या गाेटातून विष्णू सावरा व काॅंग्रेसतून भाजपत अायात झालेले राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. इथेच वानगा कुटुंबीय नाराज झाले अन‌्  शिवसेनेकडे अायतीच संधी चालून अाली. शिवसेनेने दिवंगत वानगा यांच्या पत्नी व दाेन मुलांना पक्षात प्रवेश देत श्रीनिवास यांना उमेदवारीही जाहीर केली. भाजपला सेनेकडून असे काही केले जाईल याची अपेक्षा हाेतीच. पण यावेळी सेना अधिक अाक्रमक असेल असे मुख्यमंत्र्यांना वाटले नाही. सेनेची मनधरणी करण्याचा भाजपने भरपूर प्रयत्नही केला पण यावेळी मुख्यमंत्र्यांना यात यश अाले नाही.

एकीकडे शिवसेना व भाजपमध्ये ‘युद्ध’ सुरू असतानाच दुसरीकडे काॅंग्रेस अाणि बहुजन विकास अाघाडीनेही अापापले उमेदवार जाहीर करत निवडणुकीतील चुरस अाणखी वाढवली अाहे. अादिवासी भागातील अापली ताकद पहाता सीपीएमनेही अापला उमेदवार इथे उभा केला अाहे.

तासा-तासाला पालघरवर भाजप व सेनेकडून काहीना काही क्रिया-प्रतिक्रीया घडत असल्याने उभ्या महाराष्ट‌्राचे लक्ष याकडे लागले अाहे. या साऱ्या राजकीय गाेळीबारात स्थानिक प्रश्नांचा साऱ्यांनाच विसर पडलेला दिसून येताेय. पालघरमध्ये सध्या बुलेट ट्रेनचा प्रश्न माेठा मानला जाताेय. पालघरच्या २५ जिल्ह्यांतून या बुलेट ट्रेनचा प्रवास हाेणार अाहे. केंद्र सरकारच्या विकासकामांमुळे स्थानिक मच्छिमारांचा तसेच शेतकऱ्यांचा सरकारवर राेष अाहे. वसईतील २९ गावं महापालिकेत येण्यास उत्सूक नसतानाही त्यांचा समावेश पालिका क्षेत्रात करण्यात अाल्याने गावकरी फडणवीस सरकारवर संतापले अाहेत. या विराेधात या भागात माेठे अांदाेलनही उभारण्यात अाले हाेते. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष्य करत या गावांचा पालिका हद्दीत समावेश केलाच. याचा माेठा फटका भाजपला पाेट निवडणुकीत बसू शकताे.

राजकीयदृष्ट्या विचार केला तर सहा विधानसभा मतदार संघांपैकी तीन जागा बहुजन विकास अाघाडीकडे, दाेन जागा भाजपकडे तर एक जागा शिवसेनेच्या ताब्यात अाहे. पालघर लाेकसभा मतदार संघाचा विचार करता अादिवासींसाेबतच उत्तर भारतीय तसेच गुजराती मतदारांना अाकर्षित करण्यासाठी भाजप सेनेकडून डावपेच अाखले जात अाहेत. पालघरमध्ये माेठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय असल्याने त्यांच्या मतांना अापल्याकडे वळवण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी अादित्य नाथ यांचीही सभा घेतली. स्मृती इराणींच्या माध्यमातून भाजपने गुजराती जनतेला अापलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक केवळ महाराष्ट्रापुरती उरली नाही तर अाता ती देशपातळीवर प्रतिष्ठेची झाली अाहे. मतदार नेमके कुणाला काैल देतात हे अाठवडाभरानंतर स्पष्ट हाेईलच परंतु, तुर्तास तरी निवडणूक प्रचारात तीन गाेष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात याचा शाेध कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील मतदारांनाली लागला अाहे. त्या तीन गाेष्टी म्हणजे. १. इंटरटेंन्मेंट २  इंटरटेंन्मेंट अाणि ३. इंटरटेंन्मेंट. जे भाजप व शिवसेनेकडून मतदारांचे याेग्य पद्धतीने हाेतेय.