Tuesday, February 23, 2016

काेण म्हणताे अायसीस भारतात नाही?


व्हाॅट‌्स अॅप मनाेरंजनाचं माेठं साधन झालं अाहे. म्हटलं तर याचा चांगला फायदाही करून घेता येताे. एखादी घटना घडली की तासाभरात त्याचा ऊहापाेह करणारी किंवा त्यावर मिश्किल भाष्य करणारी एखादी पाेस्ट यावर पडतेच. ज्यांना मनाेरंजन साेडून ज्ञानरंजन करायचे अाहे, अशांसाठीही अाजकाल व्हाॅट‌्स अॅप काेश महत्त्वाचे माध्यम बनत चालले अाहे. 

सकाळी असेच काही व्हाॅट‌्स अॅप पहाताना एक खूप चांगला विचार माझ्या माेबाईलमध्ये फिरत-फिरत अाला. ‘रामायणात दाेन व्यक्ती अशा हाेत्या, एक बिभीषण अाणि दुसरी कैकयी. बिभीषण रावणाच्या राज्यात राहूनही चांगला विचार करत अाणि कैकयी रामाच्या राज्यात राहूनही केवळ दुष्ट विचारांमध्येच रमत असे. दाेघांमध्येही शेवटपर्यंत बदल काही झाले नाहीत. म्हणजेच सारे काही विचारांवरच अवलंबून असते. सुधरणे अाणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असते. परिस्थितीवर नाही. ’ खरंच सुंदर पाेस्ट अाहे ही. 
 
विचारांवरून अाठवलं.. अशाच एका विचारांचं क्रूर वादळं संपूर्ण जगभरात गाेंधळ घालतयं. साेयीनुसार अापण त्याला अायसीस दहशतवादी संघटना असं नाव दिलंय. काही वर्षांपूर्वी अशाच एका क्रूर वादळाला अापण तालिबान या नावाने अाेळखायचाे. मध्यंतरी माध्यमांमध्ये खूप साऱ्या बातम्या येत. अाताही कधी-कधी एखादी सिंगल काॅलम पडलेली दिसतेच. भारतात अायसीस नाही. भारत अायसीसपासून सुरक्षित वगैरे..वगैरे.   

मी अायसीसचा उल्लेख विचारांचं वादळ असं केल्याने काहींना हे वाचताना अाश्चर्यकारक वाटेल. पण मुळात दहशतवाद हा काेणत्याही जाती-पातींशी बांधलेला नाही. ताे काेणत्याही धर्मातर्फे पुरस्कृत नाही. ती विचारधारा अाहे. क्रूर अाणि विक्षिप्त विचारधारा. महाभारत काळापासून ही विचारधारा जगावर वेळाेवेळी हावी हाेण्याचा प्रयत्न करते. काळानुरूप त्याला नवी अाेळख मिळते इतकेच. कधी ती तालिबान म्हणून अाेळखली जाते, कधी ज्यूंची निर्घुन हत्या करणाऱ्या हिटलरच्या रुपात ती वावरते तर कधी अायसीस म्हणून भल्या-भल्या देशांच्या मनात धडकी भरवते.
असाे. अशा संघटनांचा उदाेउदाे करणे अथवा त्या का उदयाला अाल्या, त्या कशा फाेफावत गेल्या हा माझ्या अाजच्या लेखाचा विषय नाही. तर हा दहशतवाद एक विचारधारा अाहे अाणि ताे प्रबळ बनत चालला अाहे असे मला वाटते. अापल्याकडे नेतेमंडळी दावे करतात, अायसीसचा भारतात प्रभाव नाही. 

दिल्लीतील निर्भयाचे प्रकरण, गाईचे मांस खाल्ले म्हणून कुटुंबावर हल्ला करून खातरजमा न करता एखाद्याचा बळी घेणं, एखाद्या तरुण मुलीची हत्या करून तिचे प्रेत उघड्यावर पडले असता सहा जणांनी तब्बल दाेन दिवस तिच्या प्रेतावर बलात्कार करणं, शेजारी जागा देत नाही म्हणून बारामती सारख्या गावात रस्त्यावर खेळणाऱ्या शेजाऱ्यांच्या मुलावर ट्रॅक्टर चढवत चिमुकल्याचा बळी घेणे इतकेच काय अारक्षणाची अवास्तव मागणी करत दाेन राज्य वेठीस धरत २० जणांचा बळी घेणं अाणि देशाचे ३४ हजार काेटी रुपयांचे नुकसान करणं  या साऱ्या घटना मला अायसीस विचारधारेच्याच वाटतात. मग अापण ठामपणे दावा कसा करू शकताे की, अायसीस भारतात नाही. अापला देश अाजही पवित्र अाहे. 

मुळात अापण एका विचारधारेचा विचार करतच नाही अाहाेत. अापण केवळ व्यक्ती केंद्रीत विचार करताेय. संस्था, संघटना केंद्रीत विचार करून काहीजण धर्माच्या चुलीवर राजकीय पाेळ्या भाजताहेत. मी वर दिलेल्या साऱ्या घटनांचा विचार करता अाणि अायसीसने कशा प्रकारे क्रूरपणे लाेकांच्या हत्या केल्या, लहान मुलांचे बळी घेतले, महिलांवर बलात्कार केले या साऱ्यांची तुलना केली तर मागील काही वर्षात अापल्या देशात झालेल्या काही घटना या अायसीस या दहशतवादी संघटनेने केलेल्या क्रूर घटनांपेक्षाही भयावह अाहेत. 
 
निर्भयाचे प्रकरण झाल्यानंतर देशभर अशा घटनांविराेधात, बलात्काऱ्यांविराेधात निषेध करण्यात अाला. परंतु यानंतरही अापल्या देशात अशा प्रकारच्या घटना थांबल्यात का? नाही. कारण अापण विचार मारत नाहीत. केवळ व्यक्तीला दाेष देत त्यांना मारण्याचे काम अापण करत अाहाेत.  हे कुठं थांबणार? कधी थांबणार? कसं थांबणार? याला केवळ एकच पर्याय अाहे. विचारांवर नियंत्रण, विचार बदलणे. विचार बदलला तरच अापली परिस्थिती बदलेल.

No comments:

Post a Comment