Monday, June 5, 2017

शब्दांची अनाेखी दुनिया

अापण नेमक्या कुठल्या दुनियेत वावरत असताे यावर अापलं जगणं अवलंबून असतं. प्रत्येकाची दुनिया निराळीच असते. काही जणांची स्वप्नांची दुनिया असते, काही जणं वास्तवात जगतात, काही जणांची इच्छाच म्हणजे त्यांचं जगणं असतं. काही जणांना या पैकी एकाही दुनियेत जगायचं नसतं. अशा या दुनियादारीत शब्दांचीही एक छाेटीशी दुनिया अाहे. हे जग तसं पहायला गेलं तर खूपसं माेठं अन्् काही जणांसाठी खूपसं छाेटंही असतं. शब्द शब्दाला भिडले की वाद हाेतात. तेच शब्द त्वेषात अाले की इगाे जागा हाेताे अाणि तेच शब्द प्रेमाने बाहेर पडले की संवाद घडताे. शब्दांच्या या दुनियेतील प्रत्येक पात्र निराळेच असते. ताे एक प्रकारचा विश्वास असताे. म्हणूनच कदाचित अापण खूप पूर्वीपासून म्हणत अालाेय.. ‘मी शब्द दिलाय...’ राजे असाे किंवा रंक सारेच जण शब्दांच्या या दुनियेत मनसाेक्त डुंबत असतात.

शब्द म्हणजेच वचन अन‌् शब्द म्हणजेच विश्वास असताे. या विश्वासाला तडा गेेला की ताे हाेताे विश्वासघात. सध्या पुन्हा एकदा हा शब्द शेतकरी अांदाेलनच्या माध्यमातून चर्चेला अालाय. सरकारने विश्वासघात केला, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशा प्रकारे साेशल मीडियावर सध्या जाेरदार शब्दयुद्ध पेटले अाहे. 

मराठी व्याकरणात मला मुळीच पडायचे नाही. पण या शब्दाची व्याख्या व्याकरणात खूप छान केली अाहे. ज्या वस्तूचा अर्थबाेध हाेताे असा वाक्यार्थ म्हणजे शब्द.  माणूस इतका प्रकारमय  झालाय की व्याकरण करणाऱ्यांनी (इथं मला व्याकरणाची उत्पत्ती, निर्माणकर्ते असे म्हणायचे अाहे) शब्दालाही प्रकारात विभागलेय. शब्दांचे प्रकार : सिद्ध,साधित, सिद्ध शब्दांचे तीन प्रकार देशी,तत्सम,तद्भव,परभाषी साधित उपसर्गघटीत,प्रत्ययघटीत-कृत(क्रुद्धात)/धातुसाधित आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक,संधी,अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त,पुनरूक्त शब्द,द्विरूकत,अंशाभ्यस्त,ध्वन्य अनुकरणवाचक शब्द. उपसर्ग व प्रत्ययांचे प्रकार इ. यात अापल्याला फारसे पडायचे नाही अन‌् मुळ विषयाला बगलही द्यायची नाही. वर उल्लेख केल्यामुळे शेतकरी अांदाेलनात सध्या हा शब्दच खूप धुमाकूळ घालताेय. शेतकरी अांदाेलनाचे मुळ शाेधण्यासाठी त्याचा खाेलात जात अभ्यास केल्यास मला शब्दाची खरी ताकद कळाली.

सध्या सुरू असलेल्या शेतकरी अांदाेलनाची खरी उत्पत्ती कशात झाली असा अापण प्रश्न केला तर अनेकांना सरकारची नामुष्की, सरकारची धाेरणं, अर्थकारण वगैरेचा बाेध हाेताे. मात्र, मला याचा विचार केल्यावर या ‘शब्दा’ने प्रचंड छळले. शेतकरी अांदाेलनाला जर खरं कुणी कारणीभूत असेल तर ताे हा ‘शब्द’च अाहे असा माझा पक्का समज झालाय.

तुम्हाला वाटत असेल की शब्दाचा यात काय संबंध? पण जरा विचार करा... मी वर म्हटल्याप्रमाणे अाधीपासूनच ‘मी शब्द दिला..’ असे म्हटले जाते. असाच शब्द भाजपने सत्तेवर येताना शेतकऱ्यांना दिला हाेता. याचेच पालन न झाल्याने सध्या राज्यभर याचा वादंग सुरू अाहे.  हजाराे टन भाजीपाला क्षणात रस्त्यावर फेकला जाताेय. रस्त्यांना दुधाचा अभिषेक केला जाताेय. वर्षभर मेहनतीने पाेटच्या पाेरासारखं ज्याला जपलं जातं ताे शेतमाल काही सेकंदात कचरा हाेताे. किंबहुना त्याचा कचरा केला जाताे. अाहे की नाही या शब्दात ताकद.  अाधी राजे-रजवाडे, मांडलीक, बादशाह हेही असाच शब्द देत असत. पण त्याकाळी शब्दाचा वकुब किंवा रुतबा इतका नव्हता की अातासारखे संप किंवा बंद केले जात. राज्यातील पहिला शेतकरी संप १९३५ ला अलिबाग येथे झालेला. विशेष म्हणजे कुठल्या शब्दासाठी नाही तर कुळ पद्धत बंद करण्यासाठी हा संप झाला हाेता.

हा संप तब्बल ६ वर्ष चालला हाेता. अलिबागच्या चरी येथे याची ठिणगी पेटली अन‌् २५ गावातील शेतकरी यात सहभागी झाले हाेते. असाे. अशा प्रथा, परंपरांविराेधात देशात अनेक लढे झाले. ते यशस्वी झाले. त्यामुळेच देशाचेही चित्र बदलले.

तर सध्या ‘विश्वासघात’ या शब्दाने चांगलाच गदाराेळ घातलाय. या शब्दाने अनेक नवे व्हिलन राज्याला दिलेत. मग ते भाजप सरकार असाे, जयाजी सूर्यवंशी हे शेतकरी नेताे असाे किंवा मुख्यमंत्री असाे. सध्या संपकरी शेतकऱ्यांना हे व्हिलन वाटतात. शब्दाचे सैन्यच इतके माेठेय की त्यातील ‘विश्वासघात’ हा एक प्यादा झाला. त्या एका प्याद्याने कसा गहजब माजवलाय ते पहा. सरकारने या शब्दाची नीट खातीरदारी केली असती किंवा त्याला नीट जपले असते व म्हटले ते केले असते तर असे घडलेच नसते. म्हणूनच म्हणतात ना शब्द म्हणजे बाण... ताे जरा जपून वापरा...

No comments:

Post a Comment