Friday, May 26, 2017

‘देवेंद्र’ फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकाॅप्टरला गुरुवारी लातूर येथील निलंग्यात अपघात झाला. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सहा सहकारी यात बालंबाल बचावले. चार नागरिक हेलिकाॅप्टर पडल्याने किरकाेळ जखमी झाले. काळजाचा ठाेका चुकवणाऱ्या अाणि क्षणात घडलेल्या या अपघाताने यंत्रणांतील अनेक त्रुटी पुन्हा एकदा उजागर केल्यात. मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबाबत अशा प्रकारचे दुर्लक्ष केले जात असेल तर इतरांचे काय? मुळात यंत्रणांच्या त्रुटी अाणि त्यांच्या अव्यवस्थित कारभारालाच टार्गेट करत भाजप व शिवसेनेने निवडणूक लढवली हाेती.

मुख्यमंत्र्यांनी अनेकदा यंत्रणांमध्ये सुधारणा करत अधिकाऱ्यांना धारेवरही धरले अाहे. त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील असेही त्यांनी अनेकदा सांगितले. मात्र मागील १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये चक्क दुसऱ्यांदा बिघाड हाेणे ही साधारण गाेष्ट नाही. मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ‘देवेंद्र’ असल्याने तसेच त्यांच्या पाठीशी चांगल्या कामांचे संचित असल्याने वेळाेवेळी ते अपघातातून बचावत अाहेत.

काल झालेल्या अपघातानंतर उपस्थितांनी हेलिकाॅप्टरकडे वेगाने धाव घेत अाधी मुख्यमंत्र्यांना बाहेर काढले. निलंग्याचे अामदार व मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे या घटनेने इतके भावनिक झाले हाेते की त्यांच्या डाेळ्यात पाणीच अाले. यापूर्वी गडचिराेलीतील अत्यंत दुर्गम अशा भागात हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाल्याने मुख्यमंत्र्यांना चारचाकीने प्रवास करावा लागला हाेता. एखाद्या चित्रपटाला शाेभतील अशा या घटना एकापाठाेपाठ घडत अाहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर काेसळण्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल. एेऱ्हवी ते खराब हाेतेच मात्र अशा पद्धतीने ते काेसळणे हा गंभीर प्रकार अाहे. स्वत: मुख्यमंत्री अत्यंत अभ्यासू अाणि मुरलेले राजकारणी अाहेत. त्यांना कदाचित या घटनांची मालिका सतावतही असेल. पहिल्यांदा नक्षल भागात मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर खराब झाल्यानंतर या प्रकरणाची चाैकशी झाली का? ती कुणी केली? निष्कर्ष काय? याकडे कुणाचेच कसे लक्ष गेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी अाज नाष्त्यात काय खाल्लं याचं तासंतास रिपाेर्टींग करणाऱ्या माध्यमांचंही याकडे दुर्लक्ष झालंय असंच दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्विकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमेचा व अभ्यासू मुख्यमंत्री मिळाल्याने भाजपनेही विविध निवडणुकांमध्ये बाजी मारली अाहे. कुणाला खाऊ देणार नाही अन‌् खाणारही नाही अशी भूमिका केंद्रात नरेंद्र यांनी तर राज्यात देवेंद्र यांनीही घेतली अाहे. यामुळे अनेकांची ‘दुकानं’ बंद झालीत. असे असताना मागील १५ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांचे हेलिकाॅप्टर दुसऱ्यांदा खराब हाेणे हा नक्कीच याेगायाेग नाही. शंकेची पाल चुकचुकायला यात वाव अाहे. निलंग्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे हेलिपॅड करणे, तीन तास अाधीच धुराळा उडू नये म्हणून पाणी मारणे, हेलिपॅडवर विजेचे खांब, लाेंबकाळणाऱ्या तारा... गणित कुठंतरी चुकतंय... साऱ्यांना सारंच खटंकतंय पण काय? हे कुणीच सांगत नाहीए. पण सुरक्षा यंत्रणांनी अाणि मुख्यमंत्र्यांनीही वेळीच सावध हाेण्याची गरज अाहे.

No comments:

Post a Comment