माेदींनी जणू अश्वमेध यज्ञच अारंभ केला अाहे. ते सध्या पाच देशांच्या
दाैऱ्यावर असून, या दाैऱ्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांनी चीनला सतत चिमटे
घेणे सुरू केले अाहे. दुसरीकडे पाकिस्तानमध्येही अस्वस्थतेचे वातावरण अाहे. अांतरराष्ट्रीय
समुदायात भारताची शांत देश अशी प्रतिमा जपण्याच्या नादात अातापर्यंत अालेल्या सरकारने
अनेकदा संयमाची भूमिका घेतली हाेती. यामुळे पाकिस्तानसाेबतच चीनचेही दरवेळी फावले हाेते.
परंतु, पठाणकाेट हल्ल्यानंतर माेदी काहीसे अाक्रमक भूमिकेत असल्याचे दिसून येत अाहे.
मुळात माेदी सत्तेवर अाल्यानंतर त्यांच्या प्रतिमेप्रमाणे त्यांचे धाेरणही अाक्रमकच
असेल असे अनेकांना वाटले हाेते. पहिल्या काही दाैऱ्यांमध्ये त्यांनी केलेल्या जबरदस्त
प्रसिद्धीमुळे अनेक अंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्यांची तशीच दखल घेतली. काही प्रसंगी
तर माेदींची पाकमधील सत्ताधीशांची तुलना करत पाकिस्तानी वर्तमानपत्रांनीही माेदींचे
हात अाखडते घेत का हाेईना परंतु, गुणगान केले. माेदींनी काय केले हे तेच जाणाेत. परंतु,
त्यांनी कसे केले याला अाता अधिक महत्त्व प्राप्त झाले अाहे.
माेदींच्या प्रत्येक हालचालींवर सध्या अांतरराष्ट्रीय समुदायाचे
बारीक लक्ष अाहे. याचाच भाग म्हणून माेदी जिथे जातात तिथे त्यांच्या विषयीच्या बातम्यांना
वर्तमानपत्रात चांगली जागा मिळते. सध्या माेदी पाच देशांच्या दाैऱ्याच्या माध्यमातून
३३ हजार किलाेमीटरचा प्रवास करत अाहेत. माेदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी अात्तापर्यंत
२० परदेशी दाैरे केले असून, या माध्यमातून त्यांनी ४० देशांना भेटी दिल्या अाहेत.
या दाैऱ्यातील माेदींच्या अखेरच्या पडावात सध्या ते अमेरिकेत
असून, या भेटीत अमेरिकेने भारताच्या बाजूने उघड-उघड बाजू घेतली अाहे. याचाच एक भाग
म्हणून अमेरिकेने ३४ देशांच्या मिसाईल टेक्नाॅलाॅजी कंट्राेल रिजीम (MTCR) मध्ये भारताचा
समावेश केला अाहे. मागील कैक वर्षांपासून या
चमूमध्ये भारताचा समावेश असावा म्हणून भारत प्रयत्नशील हाेता. भारताचा या चमूमध्ये समावेश झाल्याने भारतासाठी
अनेक संधीची दारं उघडी झाली अाहेत. जपान, अाॅस्ट्रेलिया, अमेरिका सारखे दिग्गज देश
यात अाहेत.
अाेबामा म्हणा किंवा अमेरिका या देशाने भारताला सपाेर्ट करण्यामागे
काहीतरी हेतू नक्कीच अाहे. भारताची अाशियातील शक्ती वाढत अाहे. इतर देशांशीही भारताचे
चांगले संबंध अाहेत. अमेरिकेची अार्थिक स्थिती सध्या ढासाळलेली अाहे.
भारतातील अमेरिकेचा
व्यापार पहाता भारताशी चांगले संबंध ठेवण्याशिवाय अमेरिकेपुढे दुसरा पर्याय नाही. यातच
चीनशी दाेन हात करायचे झाल्यास भारताच्या भूमिशिवाय दुसरा काेणताही पर्याय अमेरिकेपुढे
नाही. त्यामुळे अाता माेदींनीही अमेरिकेच्या परिस्थितीचा फायदा उचलण्यास प्रारंभ केला
अाहे. इतके दिवस अमेरिका दाेन दगडांवर पाय ठेऊन चालत हाेता. एकीकडे भारताला मदत करायची
तर दुसरीकडे पाकलाही कुरवाळायचे. अाता अमेरिकेने उघड-उघड पाकविराेधात भूमिका घेण्यास
सुरुवात केली अाहे. अागामी काळात काही माेठ्या घडामाेडी हाेण्याचेच हे संकेत अाहेत
असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
No comments:
Post a Comment