Thursday, May 31, 2018

अापलं जमंत नाही अन‌् मी काही तुला साेडत नाही

पालघर निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला अाहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गडबडीने पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पुन्हा एकदा ताेंडसुख घेतले. पालघरचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना भवनातून पत्रकार परिषदेचे अामंत्रण अाल्यानंतर लगाेलग साेशल मीडिया सक्रीय झाला हाेता.

काही चॅनलवाल्यांनी तर यावर कडी करत सेना भाजपसाेबत युती ताेडणार. उद्धव ठाकरे अशी घाेषणा करणार अशा स्ट्रीपही सुरू केल्या. अाेबी व्हॅन अॅक्टीव्ह झाल्या. राजकीय तज्ज्ञांकडे रिपाेर्टर्सनी धाव घेतली अन‌् अखेर पत्रकार परिषद सुरू झाली.
उद्धव यांच्या देहबाेलीवरून त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवत हाेती. ते काेणत्याही क्षणी केंद्र व राज्यातून भाजपचे समर्थन काढून घेतली अशी साऱ्यांची अाशा हाेती. पण झाले नेहमीचेच. ते अाले… बाेलले… अाणि गेले…

पत्रकार परिषदेत उद्धव यांनी लाेकशाही बचावचा नारा देत थेट निवडणूक अायाेगालाच अाव्हान दिले अाहे. निवडणूक अायाेग किती भ्रष्ट कारभार करतेय हे सांगत त्यांनी पालघर मधील निवडणूक अधिकाऱ्यांच्याच निलंबनाची मागणी केली. पालघरमध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने कसे भाजपला नाकारले हे सांगताना त्यांनी शिवसेना व बहुजन विकास अाघाडीसह काॅंग्रेसला पडलेली मते एकत्र करत त्याची गाेळाबेरीजही मांडली.

निदान शेवटच्या क्षणी तरी उद्धव बाहेर पडण्याची घाेषणा करतील अशी अपेक्षा टीव्हीसमाेर बसलेल्या तमाम महाराष्ट्रीय जनतेला हाेती. मात्र, राजकारणात मुरलेल्या व शिवसेना माहित असलेल्या अनेकांनी पत्रकार परिषदेपूर्वीच चॅनलवाल्यांचे दावे खाेडत उद्धव ठाकरे अशी काेणतीही घाेषणा करणार नाहीत हे स्पष्ट केले हाेते. चंद्रकांत दादा पाटील यात अाघाडीवर हाेते. झाले तसेच पत्रकारांनी उद्धव यांचे निवेदन संपल्यानंतर सातत्याने त्यांना अाता बाहेर पडणार का असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली परंतु, भारतात लाेकशाहीची हत्या हाेतेय या मुद्द्यावर उद्धव ठाम हाेते. त्यांनी साेयीस्करपणे पत्रकारांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. एकंदर या अर्ध्या तासामध्ये पुन्हा एकदा एक गाेष्ट अधाेरेखित झाली अाहे, ती म्हणजे, अामचं काही जमंत नाही…अन‌् मी काही तुला साेडत नाही ही सेनेची भूमीका कायम असल्याचे.

भाजप सेना-युतीला ३४ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालाय. सेने भाजपमध्ये सर्वप्रथम १९८४ मध्ये युती झाली हाेती. लाेकसभेच्या निवडणुकीत मनाेहर जाेशी व वामनराव महाडिक भाजपच्या तिकीटावर लढले हाेते. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये काॅंग्रेसबद्दच्या सहानुभूतीमुळे या दाेन जागा साेडल्या तर देशभरात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला हाेता. यानंतर सातत्याने सेना-भाजपयुतीमध्ये चढ-उतार हाेत अालेत. १९८४ पासून ते अाज २०१८ पर्यंत अनेकदा सेना-भाजप युतीमध्ये फूट पडलेली अापल्याला दिसून येते.

अाता चित्र पालटले अाहे. दाेनही पक्षांनी एकमेकांचा अाधार घेत महाराष्ट्रात स्वत:चे स्थान निर्माण केले अाहे. भाजपनेही ग्रामीण भागात अापली ताकद वाढवत सेनेच्या ताब्यातील अनेक पालिका, ग्रामपंचायती, गा्वं, खेडी ताब्यात घेतली अाहेत.

शिवसेनेनेही भाजपला चिमटे काढणे काही साेडलेले नाही. वारंवार अाम्ही राजीनामे खिशातून ठेऊन फिरताे हे सांगायचे पण ते द्यायचे काही नाहीत या सेनेच्या अजब भूमिकेने सेनेतील निष्ठावानही कंटाळलेत. राज्यात जर युती तुटली किंवा सरकारमधून अापण बाहेर पडलाेत तर सेना फुटेल अशी भिती पक्षश्रेष्ठींना असल्याचे सेनेचे काही नेते व शिवसैनिक खाजगीत बाेलताना सांगतात. ही भितीच वारंवार खरी ठरतेय.

भाजप विराेधात जितके अाराेप मागील काही वर्षांपासून सेना करतेय तितके अाराेप विराेधकही करताना दिसत नाहीत. दाेघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण प्रत्यक्षात कधी अंमलात येतेय तेच पहाण्यात विराेधक व्यस्त अाहेत. असाे, उद्धव यांनी पुन्हा एकदा भाजपवर केवळ अागपाखड करत तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना हेच सिद्ध केलंय असं म्हणायला काही हरकत नाही….

1 comment:

  1. नेमकेपणाने विश्लेषण..👌👌
    सेनेच्या या वृत्तीमुळे आता शिवसैनिक देखील खऱ्या अर्थाने अस्वस्थ झाले आहेत, पण त्यांचीही गत धरता येईना,सोडता येईना अशीच काहीशी झाली आहे.

    ReplyDelete